Friday, January 15, 2010

अर्जुनाचे द्वंद्व

कदाचित हि कविता बर्याच जणांना आवडणार नाही, किंवा पटणार नाही. हे साधे सुधे द्वंद्व आहे जो प्रतेय्क जण अनुभवतो आहे.
विचार हे प्रश्न स्वथाहालाच कदाचित ह्याचे उत्तर आजही अपूर्णच  आहे.

अर्जुनाचे द्वंद्व 

त्याला तीही आवडते आणि बायकोही 
कळेना कोणाच्या पारड्यात जावे 

तिच्या नेत्रातून त्याला जग बघायचे आहे
हिच्या नेत्रातून त्याला जग बदलायचे आहे

तिची प्रत्येक गोस्तच ह्याला अपूर्वाई 
हिची प्रत्येक गोस्त त्याला नवलाई 

तिच्या श्वासात ह्याला सापडतो गंध जाईचा
हिच्या श्वासात उगवतो निशिगंध निशेचा

ती सांगते मालकी हृदयावर त्याच्या
हिची मात्र त्याच्या आयुष्य्वर छाया

तिला तो सांगतो गुपिते सारी मनातली
हिला तो सांगतो स्वप्ने सारी मनातली 

ती म्हणते त्याला तूच होना माझा 
हिला मात्र वाटते तो आहेच कि माझा

ती आणि हि हया मध्ये कोण द्वंद्व अर्जुनाच्या मनात आहे
कृष्णसखा काय सांगणार राधा आणि रुक्मिणी हा प्रश्न तरी उनुत्तारीच आहे

कित्येक युगे गेली हया प्रश्ना मध्ये, 
रामायणे आणि महाभारते हि झाली आहेत

होवून कृष्ण मलाच हे सोडवावे लागेल
गीता नाही तरी नवीन काहीतरी लिहावेच लागेल;

महेश उकिडवे


5 comments:

Unknown said...

mast mitra mast... khup sunder.

Unknown said...

Really good one....

महेश उकिडवे said...

बसून रथात पळवीन रुक्मीणीला
हृदयी माझ्या ठेवीन मी राधेला

दोघांची भेट काही केल्या होणार नाही,
राधा आणि रुक्मिणी मग कधी रुसणार नाही

Unknown said...

khup mast lihitos.. who is the inspiration??? Very nice answer :)

Anonymous said...

Mastach ekdum... keep it up!

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...