Sunday, February 27, 2011

भेटीतून काय साधेल

वाटते भेटावेसे मग स्वताला आवरू नकोस 
भेटावयाचे नसेल तर कारणे शोधू नकोस

भेटलो काय किंवा नाही भेटलो आपण फरक कोणा पडतो? 
पडतो ज्याला फरक तो थोडीच भेटायचे टाळतो.

भेटल्याने असे काय होणार आहे, जे न भेटल्याने होत नाही
न भेटताही जे थांबवू शकलो नाही ते भेटण्याने थांबणार नाही 

ठेवून मनात शंका,  जरी उद्या भेटलो ती भेटही न भेटण्या सारखीच असेल , 
न भेटताही जर मिटल्या शंका, तर भेटीची गरजच का उरेल.

भेटीतून काय साधेल , काय घडेल  ह्याचा का विचार करावा
भेटण्या आधीच आपण न भेटण्याचा पण का करावा

मान्य मला दुखेल काही, खुपेल काही , कोणा कोणास भेटीने आपल्या
मग न भेटता ते कसे टळेल, हे तरी समजाव मला जरा

मुळीच नाही हट्ट भेटण्याचा, कि पण नाही केला न भेटण्याचा
बघू तरी किती दिवस हे स्पंदन दोन जीवांचे वेगळे धडधडते 

हा भेटीचा हट्ट नाही गडे, ओढ म्हणून भेटावेसे वाटते, 
कोण म्हणतो, मेल्यावरती ओढ भेटीची थांबते.....

थेंब थेंब होवून पाऊस, पुन्हा पुन्हा ते भेटू पाहते 
पहिल्या पावसाच्या सुगंधात ते दरवळू पाहते 

महेश उकिडवे










मद्याला हल्ली मी ना भुलू लागलो


जाता जाता पहिले तुला अन चढली ती नशा,
तू गेल्यावरही, उतरते कुठली, अजूनच मुरली ती नशा.....

लोक म्हणती कधी मोजतो हा पायऱ्या माडीच्या 
लोक म्हणती हा रुळतो हल्ली पायरी मद्यालयाच्या

केले पेलेच्या पेले रिकामे,रिचवले मी किती प्याले , 
वारांगनेच्या उंबरठ्यावरी गेले, त्या नंतर दिवस सारे, 

पहिले जावून भजनाला, देव पूजेला आणि यात्रेला 
पहिल्या ओढून माळा, पहिला करून धूप, दीप अन अंगारा.

कळेना लोक एवढे खोटे कधी झाले, खरे काय ते बघण्यासाठी 
मादिरालये, माड्या, देव, देवळे, सगळे माझे करून झाले 

दिसलीस तू त्या दिवशी पुन्हा, हाय खाडकन उतरली नशा 
आता मला कळाले, इतके दिवस केले ते अरे उपाय व्यर्थ गेले

लोक म्हणू लागले कि त्या दिवसा नंतर मी निरीश्वर झालो ,  
लोक म्हणे कि कुठल्याच मद्याला हल्ली मी ना भुलू लागलो ,  

महेश उकिडवे

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...