Sunday, August 23, 2015

हीच चिंता त्या शब्दांच्या माथी


विचारांचा घोटला गळा,भावनांचा केला चक्काचूर
विचारतात उरले काय मग , मनाच्या तळाशी आता

तो विचार, ती भावना ह्यांचा बळी घेवून जन्मली कविता

तू चुंबिता ते शब्द कवीचे , झाले जिवंत सगळे पुन्हा
विचार झाले शिरजोर, भावना झाल्या अनावर पुन्हा

देवून जीवन त्यांना तू घेतलास बळी कवितेचा ,


जन्म  की मृत्यू  दोन्ही खेळ ना कोणाच्या हाती
मोक्ष कसा लाभावा, हीच चिंता त्या शब्दांच्या माथी

हीच चिंता त्या शब्दांच्या माथी

एक थेंब तुझ्यासाठी .
23 August 2015 

Sunday, August 16, 2015

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना





सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….

आणलेस का मज सांग ना , ओंजळीतून हे शिंपले
स्वप्नापरी जे रंगले , होऊन मोती किती सांडले
नकाराची तुला मी……  देवू किती कारणे ,
घे की रे समजून साजणा , मन मोहना  मन मोहना .

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….


हैराण मी, व्याकूळ मी , तो स्पर्श का वाटे हवा मला
तनमनात भरलेला गंध वेडा शोधते मी दुराव्यात हि ….
नकाराची तुला मी……  देवू किती कारणे
ओढ हि मनीची  संपेल कशी  सांग ना , सांग ना

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… धृ….

ठेवून भाळी अधर तुझे का भरलेस मळवट असे  
शमली माझी क्षुधा , तृपता दाटली मनी माझ्या
नकाराची मला  …सापडूच नये कारणे  आता
उगा लांबलेली भेट हि घेवून मिठीत संपवना संपव आता

सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना
सांगू किती आईकना , आईकु किती सांग ना …… ….

एक थेंब तुझ्यासाठी
१५ ऑगस्ट २०१५ 

रांगोळी ...

  रांगोळी  रंगारी तू माझा , सावळा रंगारी  रंग तुझा लेवून  सजले मी अंतरी   रंगवलीस कितीदा भरुनी ओंजळी  मिसळले केव्हाच , माझे मी पण गेले लयास ...